विदर्भ प्रमुख विभाग.युसुफ पठाण
पुरोगामी चळवळीचे अभ्यासू कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या सनातनी प्रवृत्तीच्या संघटनेच्या लोकांकडून शाई फासत धक्काबुक्की करण्यात आली.
या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा जिल्हा व शहर शाखा वर्धा तसेच सर्व पुरोगामी संस्था संघटना समन्वय समिती वर्धा जिल्हा यांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहे आणि या प्रकरणी तत्काळ चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी मा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मा जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत निवेदन देवून करण्यात आली.
सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागचे सूत्रधार पकडण्यात यंत्रणांना अजूनही यश आलेले नसल्याने या प्रवृत्तींना कायद्याचे भय वाटेनासे झाले आहे. म्हणूनच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांवर ते असे उघडपणे हल्ले करण्यास धजावत आहेत
गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून दिसून येते.
या हल्ल्यासाठी हल्लेखोरांनी दिलेले कारण अत्यंत तकलादू असून कायद्याच्या राज्यात कोणत्याही कारणाने असा हल्ला करणे हे निषेधार्हच ठरते.
अत्यंत खेदाची बाब म्हणजे जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात मंजूर होऊन तीन दिवसही उलटले नाहीत तोच गायकवाड यांच्यावर हल्ला झालेला आहे. या हल्ल्यामार्फत सनातनी प्रवृत्तीने पुन्हा एकदा हा संदेश दिला आहे की ते या नवीन कायद्याला देखील जुमानत नाहीत.
हे संत, सुधारकांचा वारसा सांगणार्या महाराष्ट्राला भूषणावह नाही. तरी, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणार्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन यांच्या विरुद्ध कसलाही पक्षपात न करता कठोर कायदेशीर कारवाई करून कायद्यासमोर सर्व समान आहेत हे त्यांना आणि जगाला दाखवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र अंनिस करीत आहे.
निवेदन देण्यासाठी सत्यशोधक समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक चोपडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे, महिला विभागाच्या कार्यवाह व्दारकाताई ईमडवार, किसान सभेच्या अनुराधा उटाणे , युवा सोशल फोरम चे अध्यक्ष सुधिर पांगुळ, कैलास जुनारकर,अलीम शेख आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

