इम्रान खान सरफराज खान:- बार्शीटाकळी प्रतिनीधी
सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याचे माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे.
एस टी बसेस सोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भड्याला मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनाच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढ १ फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत.राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक काल मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत एसटी सह रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेतला.
एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोल वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी अपेक्षित होणे अपेक्षित असते. मात्र मागील ३ ते ४ वर्षापासून एसटीची भाडेवाढ झालीच नव्हती. त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती आजपासून लागू होईल. तसच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही ३ रुपयाची वाढ करण्यात आली असून तो निर्णय १ फेब्रुवारी पासून लागू होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


