अल्पवयीन पळून आलेल्या प्रेमविरांचे समुपदेशन करून योग्य वयात आल्यावर करून दिले लग्न…..
वसा जिजावूचा समता सम्मान महिलांचा या राज्यस्तरीय दि 3 ते 12 जानेवारी या प्रबोधन मोहिमे अन्तर्गत लावला सत्यशोधकी विवाह….
आजच्या तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन, यूट्यूब, फेसबुक, सिनेमा यांच्या मुळे तसेच कुटूंबात समाजात,शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अतिशय अल्पवयीन मुलगा मुलगी प्रेमात पडून त्यांच्यात शारीरिक संबध निर्माण होऊन कुमारी मातांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे आज या मुला मुलींचे शालेय पातळीवर समुपदेशन करण्याची गरज आहे कारण अल्पवयीन मुला मुलींचे प्रेमसंबंध हि सामाजिक समस्या निर्माण झाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन वयात प्रेम करणारे व नंतर कायदेशीर वयात आलेल्या रितीक विलास वानखेडे घोडेगाव ता देवळी जि वर्धा आणि वृषाली गजानन अंभोरे रा गोरेगाव मुंबई यांचा सत्यशोधकी विवाह मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृह येथे आयोजित वसा सावू जिजावूचा समता सम्मान महिलांचा या दि 3 ते12 जानेवारी या राज्यस्तरीय प्रबोधन मोहिमे अन्तर्गत कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने करून देण्यात आले
रितीक व वृषाली हे कामाला एकाच ठिकाणी असतांना ओळखीतून प्रेमात पडले याची कुणकुण वृषालीच्या घरच्यांना लागताच त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रेम आंधळे असते त्यांना सर्व जगच प्रेमाचे शत्रू दिसतात अशा वेळी समजावाण्याचा कोणताही परिणाम यांच्यावर होत नाही उलट सारे जगच आपले वैरी असे समजून दोघेही सिनेमा स्टाईलने आत्महत्या करतात किंवा घरून पळून जातात व घात लावून बसलेल्या समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांच्या अलगद हाती पडतात वृषाली व रितीक विरोध होताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले यांच्या कडे पळून आले राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांची दोघांनीही वर्धेतील काही ओळखीच्या मित्रांसह भेट घेतली व लग्न लावून देण्याची विनंती केली दोघांचेही कागदपत्रे तपासल्यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू होतो हे लक्षात आले कायदेशीर समुपदेशन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड दुर्गा प्रसाद मेहरे याचा कायदेशीर सल्ला घेतला तिकडे वृषालीच्या घरच्यांनी पोलिस तक्रार दिली पोलिस कार्यवाही पासून वाचण्यासाठी व पुढील अनर्थ टाळण्यासाठी वृषालीला सखी वन स्टॉप सेन्टरच्या प्रशासक रेश्मा रघाटाटे यांची मदत घेऊन वृषाशालीला वन सखी स्टाॅप सेन्टर मध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही करून दाखल केले पोलिस येवून दोघांच्यांही कुटूंबाच्या उपस्थितीत लग्नाचे वय झाल्यावर लग्नं लावून देवू असे आश्वासन दोन्ही कुटूंबांनी दिले
रितीकचे चे वय 21 झाल्यावर ठरल्याप्रमाणे या प्रेमीयुगुलांचे लग्न म.ज्योतीबा फुलेंच्या सत्यशोधक विवाह पध्दतीने मान्यवर व उपस्थितांच्या उपस्थित लावून देण्यात आले लग्नाची सर्व कायदेशीर बाबी गजेंद्र सुरकार यांनी करून घेतल्या तर लग्नाचे सोपस्कार वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृह येथे , जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले तनू वराडे डॉ मंजुषा देशमुख,संघर्ष यांनी पार पाडले
कार्यक्रमाच्या मंचावर यावेळी , वर्धा वर्धन हाट चे संचालक मोहन खैरकार, जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, तालुका अध्यक्ष अरूण चवडे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, दारूबंदी आंदोलनाचे भाई रजनीकांत व मुलाकडील आई वडील मोठे वडील मोठी आई हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले तर प्रस्ताविक राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
विधान, गुड्डू देशमुख व सभागृहाचे कर्मयांनी परिश्रम घेतले.

